#waragainstcorona: देशात 24 तासात 83 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारांवर!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/5-2.jpg)
नवी दिल्ली ।महाईन्यूज । ऑनलाईन टीम
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारा जवळ गेला आहे.
देशातील रुग्णांचा आकडा आता 39 हजार 980 वर गेला आहे. आत्तापर्यंत 10 हजार 663 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत देशात 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 521, गुजरातमध्ये 262, मध्य प्रदेशात 151, राजस्थानात 65, दिल्लीत 64, उत्तर प्रदेशात 43, आंध्र प्रदेशात, 33, पश्चिम बंगालमध्ये 33
तमिळनाडूमध्ये 29, तेलंगाणा 28, कर्नाटकात 25, पंजाबमध्ये 20, जम्मू-काश्मिर 8, हरियाणा 4, झारखंड 3, बिहार 4, आसाम 4, हिमाचल, प्रदेश, मेघालय आणि ओडिसामध्ये प्रत्येकी एक जणांचा मृत्यू झाली आहे.