breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; मुंबईनंतर दिल्लीतही हजारो मजूर रस्त्यावर

देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात ३ मे पर्यंत लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी मुंबईतील वाद्रे रेल्वे स्थानक परिसरात हजारो मजूर जमल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच त्यांनी आपल्याला घरी जाऊ देण्याची मागणी केली होती. त्यांनतर आता बुधवारी दिल्लीतील काही मजूर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील काश्मीर गेटनजीक यमुना नदीजवळ रोजंदारीवर काम करणारे हजारो कामगार जमल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या अनेक दिवसांपासून यमुना नदीच्या किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं लोक राहत आहेत. दरम्यान, त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात येत असून त्यांची खाण्यापिण्याची सोय केल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हे मजूर कोणत्या कारणामुळे त्या ठिकाणी जमले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारकडून सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात येत आहे. तसंच वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र झटत आहेत. परंतु अशा घटनांमुळे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button