INDIA vs CHINA: लडाख सीमेवर तणाव संपवण्यासाठी चीनची ‘ऑफर’, पण भारत ठाम
![Conflict once again in the Indo-Chinese army, incident in Assam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/INDIA-CHINA-DEFENCE-COMPARISON.png)
नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कर तोपर्यंत तैनात आहे जोपर्यंत चीनी लष्कर त्यांच्या जागेवरून माघारी नाही होत. दोन्ही देशांमधील संबंध पुनर्संचयित करण्यासाठी चीनला 20 एप्रिलच्या आधीच्या परिस्थितीत जावं लागेल असं अनेकदा भारताकडून चीनला सांगण्यात आलेलं आहे. पण त्यावर चीनकडून कोणतीही पाऊलं उचलली गेलेली नाहीयेत. इंग्रजी वृत्तपतत्राच्या वृत्तानुसार, चीनच्या अशा हट्टामुळे भारतही आपल्या मुद्द्यावर ठाम आहे.
एका अहवालानुसार, ‘चीनच्या सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीने या संपूर्ण घटनेला स्टारिंग मॅच बनवलेलं आहे. यावर भारताने हातवर हात ठेवून बसून राहवं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे भारतही अशी कठोर पावलं उचलण्याची तयारी दाखवत आहे जेणेकरुन चीनला सीमा वादाचा परिणाम लक्षात येईल. दोन्ही बाजूंच्या लष्करी कमांडर्सच्या बैठकीत पीएलए भारतीय सैन्याला ‘न्यू नॉर्मल’ ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. या अहवालानुसार लष्कराचा एक सेनापती म्हणालेला की, “आक्रमक आणि सीमेवर वाढता ताण असूनही पीएलएला भारतीय सैन्याकडून लष्करी बक्षीस हवं आहे.”