breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय
#COVID19 : भारत-नेपाळ सीमावर्ती भागात परप्रांतिय कामगार अडकले; लॉकडाउनमुळे अनेकांना आधार मिळेना!
काठमांडू । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
केंद्र सरकारने सर्व राज्यांना सीमा ‘सील’ करण्याचे आदेश दिले आहेत आणि लोकांच्या हालचाली होऊ नयेत यासाठी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. नेपाळ सरकारनेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत लॉकडाऊन वाढविला आहे. कारण, नेपाळमधील कोरोनाबाधितांची संख्या ५ वर पोहोचली आहे.
परिणामी, नेपाळ-उत्तराखंड सीमा भागात लॉकडाउनमुळे होत असताना धारचुला येथे अनेक परप्रांतिय कामगार अडकले आहेत. त्यामुळे संबंधित कामगारांना आता नेपाळमध्येही जाता येत नाही आणि भारतातही येता येईना, अशी अडचण निर्माण झाली आहे.