breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: मजुरांसाठी रोज ३०० ट्रेन चालवू शकतो; पण राज्यांची मान्यता नाही: पीयूष गोयल
देशभरात करोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली आहे. लॉकाउनच्या कालावधीत सर्व उद्योगधंदेही ठप्प आहे. त्यातच रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी कामगार पायीच आपापल्या मूळ गावी जाताना दिसत आहेत. याच दरम्यान रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतीय रेल्वे मजुरांना आपल्या नियोजित ठिकाणांपर्यंत पोहोचवण्यासाठी रोज ३०० ट्रेन चालवू शकते. परंतु अनेक राज्य त्यासाठी परवानगी देत नसल्याचे ते म्हणाले.