CoronaVirus : देशभरात टोलवसुली बंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नवी दिल्ली | महाईन्यूज
कोरोनाच्या संकटामुळे देशभरात टोलवसुली स्थगिती ठेवण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व टोलनाके बंद राहणार आहेत.
कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. त्याला लढा देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने राज्यासह देशभरात Lock Down आदेश लागू केले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली होणार नाही, असे मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केले आहे.
संचारबंदी लागू झाल्यामुळे कोणालाही विनाकारण वाहनाने प्रवास करता येत नाही. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, वैद्यकीय कारणास्तव होणारी वाहतूक यासाठीच प्रवासाला परवानगी आहे.