#CoronaVirus: गावाकडे असणा-या कुटुंबाच्या काळजीपोटी, पायी निघाला चिंतामजूर वर्ग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-285.png)
संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे 14 एप्रिलपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार आहेत. राज्यांच्या सीमा पूर्णपणे बंद आहेत. मात्र हातावर पोट भरणा-या मजूरांचे गावाकडे राहणारे कुटूंब हे त्यांच्यावर अवलंबून असून त्यांची काळजी कशी घेणार आणि त्यांना पैसे कसे पोहचवणार हा मोठा प्रश्न या मजूरांपुढे आहे..त्यामुळे या मजूरांनी आपल्या जीवाची परवा न करता आणि होणा-या परिणामांची तमा न बाळगता पायीच गावी आपल्या कुटूंबाकडे जाण्य़ाचा निर्णय घेतला आहे …
‘सरकार आमच्यासाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय करत आहेत पण आम्हाला इथे रोजगार नाही, मग आम्ही गावाकडे आमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना पैसे कसे पाठवणार? असा सवाल दिल्लीतील मजूर वर्ग विचारत आहे.
इथे असणारे अनेक कामगार हे उत्तरप्रदेशचे आहे. हा वर्ग रोजंदारीवर काम करणारा आहे. मात्र कोरोनामुळे बंदी असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. अशावेळी या गरीब मजूर वर्गाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार, अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन गरीब लोकांसाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय करत आहेत.
गावाकडे या मजूरांवर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांनाचा प्रश्न कोण सोडवणार हा मोठा प्रश्नच आहे…