breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनानंतर अर्थव्यवस्थेचं युद्ध: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-7.png)
सध्या करोनानं थैमान घातलं आहे. याचा आकडा वाढतोय. पण तो आपल्याला कमी करायचा आहे आणि आपण तो नक्की कमी करू. आपण करोनावर नक्कीच विजय मिळवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना घरात थांबण्याच्या सुचना केल्या. तसंच आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जनतेला व्यायाम करण्याचा सल्ला दिला. करोनाच्या युद्धानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेचं युद्धही लढायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.