breaking-newsताज्या घडामोडी
कोकणच्या चाकरमान्यांना दिलासा, चार विशेष पॅसेंजर दररोज धावणार
![Why aren't passes given to those who travel to Mumbai every day from Pune and Nashik ?, Mumbai High Court asks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/train-3.jpg)
मुंबई – यंदा गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वे प्रशासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.या सणानिमित्त होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आता कोकण रेल्वे मार्गावर चार आरक्षित विशेष पॅसेंजर आणि एक्सप्रेस ट्रेन दररोज धावणार आहेत.
या चार आरक्षित गाड्यांमध्ये रत्नागिरी – दिवा जंक्शन – रत्नागिरी गाडी क्रमांक – ०१५०४/०१५०३ ,रत्नागिरी- मडगाव जंक्शन एक्सप्रेस विशेष गाडी क्रमांक- ०१५०१/०१५०२ ,मडगाव जंक्शन – सावंतवाडी रोड- मडगाव जंक्शन एक्सप्रेस विशेष गाडी क्रमांक – ०१५०८/०१५०७, सावंतवाडी रोड- दिवा जंक्शन – सावंतवाडी रोड एक्सप्रेस विशेष गाडी क्रमांक – ०१५०५/०१५०६ यांचा समावेश आहे.