ताज्या घडामोडी

सरकार पाडण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करून दंगल घडवण्याचा प्रयत्न

नाशिक | औरंगाबादला झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणा बाबत मालेगावात प्रतिक्रिया उमटल्या असून सरकार पडण्यासाठी भाजप राज ठाकरे यांचा वापर करत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केला. राज ठाकरे यांना राज्यात दंगली घडवयाच्या आहेत ते एक मोठे नेते होते. मात्र, त्यांचे अस्तिव धोक्यात आल्यामुळे भावनिक मुद्दे उपस्थित करत असल्याचे आमदार मुफ्ती यांनी सांगितले.

सभेत बोलतांना राज ठाकरे यांनी एका प्रकारे धमकी दिली असून त्याची राज्य सरकारने दखल घ्यावी. शिवाय ४ तारखेला मशिदीसमोर भोंगे लावून वातावरण बिघडविणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर मोका लावण्याची मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मेची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र, ४ मेपासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पत आवाजात हनुमान चालीसा म्हणा’, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. सरळ भाषेत ‘त्यांना’ कळत नसेल तर एकदा होऊनच जाऊ द्या, असा आक्रमक सूरही त्यांनी लावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button