breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

Auragabad Railway Accident | उच्चस्तरीय समितीकडून रेल्वे, पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी

औरंगाबाद | करमाड येथे १६ मजुरांना रेल्वेनं चिरडल्याच्या घटनेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीनं रेल्वे अपघाताशी संबंधित रेल्वे कर्मचारी आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकात चौकशी सुरू केली आहे. रेल्वे आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

या घटनेच्या चौकशीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीनं रेल्वेचे कर्मचारी आणि संबंधित पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांसमक्ष त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. दरम्यान, रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. आताच घटनेबाबत काही सांगता येणार नाही, अशी माहिती डीआरएम उपींदर सिंह यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button