तीन हजारांच्या सरकारी पेन्शनसाठी ४६ लाख अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-63.jpeg)
दिल्ली | प्रतिनिधी
सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर लोक पुढे येत आहेत. असंघटीत कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारची जी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून देशातील मजुरांना दरमह ३००० रुपये पेन्शन दिली जाते. मात्र या योजनेसाठी तब्बल ४६ लाख १७ हजार लोकांनी अर्ज दाखल करून नावे नोदावली आहेत.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजने अंतर्गत देशातील ४२ कोटी मजुरांना लाभ मिळत आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात. त्यांना ६० वर्ष वयापर्यंत ५५ ते २०० रुपये हप्ता भरावा लागतो. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना पेन्शन सुरू होते. दरमहा ३००० म्हणजेच वर्षाला ३६ हजार मिळतात. करदाते या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत. अर्जदाराचे मासिक उत्पन १५ हजारपेक्षा कमी असायला हवे. अर्जदाराचे बचत खाते किंवा जंधान बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी विक्रेते, हेड लोडर, वीत्भात्ती कामगार, चर्मकार घरकाम करणारे, भूमिहीन मजूर, रिक्षा चालक, कचरा वेचणारे, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार, इत्यादींचा लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. या योजनेसाठी अर्ज करणार्यांना आधार कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक फोटो, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर, आदीची आवश्यकता आहे.