सुरक्षा मंडळाने 2 भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या विरोधात पाकिस्तानच्या आणखी एका निर्णयाला नकार देण्यात आला. पाकिस्तानने दोन भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा ठराव आणला. हे सुरक्षा परिषदेने नाकारले. यूएन मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस पीरूमूर्ती यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. यंदाची दुसरी वेळ आहे जेव्हा पाकिस्तानने या प्रकारची भूमिका घेतली आहे. दोन्ही वेळा दोन-दोन भारतीयांना त्यांनी दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळा त्यांना अपयश आले.
यूएन सुरक्षा परिषदेत 1267 समिती नावाची एक समिती आहे. ही सिमीती दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्या कोणत्याही देशातील नागरिकांना प्रतिबंधित यादीमध्ये समाविष्ट करू शकते. याची चौकशी केली जाते. मग त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले जातात. यात ट्रॅव्हल बंदी आणि अकाउंट फ्रीझचा समावेश आहे. अंगारा अप्पाजी आणि गोविंदा पटनायक या दोन भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा ठराव पाकिस्तानने ठेवला होता.
यावर्षी हे दोघ पकडून पाकिस्तानने एकूण चार भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा कट रचला होता. सूत्रांच्या माहितीनुसार चौघेही अफगाणिस्तानात नोकरी करत होते. येथे तालिबानच्या मदतीने पाकिस्तान भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. एका अहवालानुसार, चार भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याची युक्ती पाकिस्तानने केली. याची जाणीव भारतीय गुप्तचर यंत्रणांना झाली. त्यांना गुप्तचर अभियानांतर्गत भारतात आणण्यात आले होते.
सुरक्षा परिषदेत समाविष्ट असलेल्या अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि बेल्जियमने पाकिस्तानचा प्रस्ताव नाकारला आणि त्यावरील पुढील कार्यवाहीही थांबविली. तिरुमूर्ती म्हणाले- पाकिस्तानला आपल्या राजकारणासाठी 1267 समिती वापरायची आहे. त्याला धार्मिक रंग द्यायचा आहे. मात्र, परिषदेने त्यांची हालचाल यशस्वी होऊ दिली नाही. आम्ही या सदस्यांचे याबद्दल आभारी आहोत.