संतापजनक! नोकरी जाण्याच्या भीतीनं एकाच कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या
धारवाड: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले तर काही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली होती. याच दरम्यान नोकरी गेल्याच्या विवंचनेतून दाम्पत्यानं आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. कोरोनामुळे नोकरी गेली तर जगायचं कसं आणि दुसरी मिळणार कशी या भीतीपोटी एकाच कुटुंबातील तीन जणांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.
कर्नाटकातील धारवड इथे तरुण त्याची पत्नी आणि मुलगी अशा तिघांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी घटनास्थळावर पोलिसांना एका सुसाईड नोट देखील मिळाली आहे. दरम्यान तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य लॉकडाऊन आणि कोरोनामुळे नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे अस्वस्थ झाले होते. त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.