breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
रेल्वेने प्रवास करायचा असल्यास आरोग्य सेतू अॅप वापरणे अनिवार्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Arogya-setu.jpg)
नवी दिल्ली | कोरोनामूळे देशांतर्गत विविध गाज्यांत अडकलेल्या मजुरांसाठी, श्रमिकांसाठी केंद्र सरकारने विशेष ट्रेन सुरु केल्या. कालपासून (१२ मे) नवी दिल्लीवरुनही काही विशेश ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवासासाठी लोकांनी स्टेशनवर गर्दी केली होती. दरम्यान, रेल्वेने आता स्पष्ट केले आहे की, ज्या प्रवाशांना विशेष ट्रेन्सद्वारे आपल्या गावी जायचे आहे, त्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य असणार आहे.
जर का ते नसेल तर प्रवासावार बंदी आणली जाऊ शकते. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ज्या भागात जास्त कोरोनाचे संक्रमण आहे अशा भागात अॅप वापरणे जास्त गरजेचे आहे.