रेल्वेकडून ३० जूनपर्यंत सर्व बुकिंग रद्द, विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार
नवी दिल्ली | भारतीयय रेल्वेने ३० जूनपर्यंतचे सर्व तिकिटांचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करणार असल्याचे रेल्वेकडून सांगितले आहे. तर आता फक्त विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या देशात तिसरे लॉकडाऊन १७ मेला संपणार आहे. त्यापूर्वीच देशात लॉकडाऊनचा चौथा घोषणा होणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१२ मे) जनतेशी संवाद साधताना दिले आहे. त्यामुळे रेल्वे ३० जूनपर्यंतचे सर्व तिकिटांचे बुकिंग रद्द केल्याच्या चर्चा आहेत.
रेल्वेने ११ मे रोजी ट्रेन्ससाठीचे ऑनलाईन बुकिंग करण्यासु सुरुवात केली होती. प्रवाशांकडून एकाच वेळी तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न झाल्याने अवघ्या काहीच मिनिटांत IRCTCची वेबसाईट क्रॅश झाली होती. यानंतर ११ मे रोजी सायंकाळी रेल्वे विशेषसाठीच्या तिकीट बुकिंगला पुन्हा सुरुवात करण्यात आली. या संकेतस्थळाच्या मदतीने हजारो प्रवाशांनी इच्छित स्थळी जाण्यासाठीची तिकीटे आरक्षित केली.