breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

मुंबई मनपा आयुक्त नागपुरात, कोरोना रोखण्यासाठी इक्बाल चहल यांची खास रणनीती

नागपूर | “मुंबईत केलं त्याप्रमाणे नागपुरात काम करण्याची गरज आहे”, असं मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले. ते आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

“मुंबईत आम्ही सर्व्हेलान्स केलं, घरी जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या. या पद्धतीने काम सुरु आहे. तेच सगळं नागपुरात करण्याची गरज आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

“प्रत्येक शहरात वेगवेगळी कारणं आहेत. रुग्णाला लगेच रिपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरु झाली पाहिजे. उशिरा रिपोर्ट मिळाले, तर ट्रीटमेंट उशिरा होते आणि त्यामुळे मृत्यू वाढतो “.

“सुरुवातीला मुंबईमध्ये सुद्धा मृत्यूदर जास्त होता. तो आता कमी झाला आहे. बेड उपलब्ध करुन देण्यासाठी उपाय करणे, रुग्णाला बेड मिळणे आवश्यक आहे. टेस्टिंग वाढल्या तर रुग्ण वाढतील”, असं इक्बाल चहल यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button