breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला गेलेल्या ‘त्या’७ जणांना कोरोनाची लागण
कोरोनामुळे देशात तिसरा लॉकडाऊन ४ मेपासून सुरू होणार आहे. तसेच, हा निर्णय घेण्याआधी केंद्राने देशात अडकलेल्या श्रमिक मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन रवाना केल्या होत्या. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या काही कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या कामगारांपैकी सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रत्येक डब्यात ७२ ऐवजी फक्त ५४ प्रवासी असतील. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर मध्य रेल्वेने नाशिकमधून भोपाळसाठी काल (१ मे) रात्री ९.३० वाजता विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती.