महात्मा गांधींचा सत्याग्रह हे नाटक होते : भाजपा नेता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/BJP-Leader.jpg)
बेंगळुरु | माजी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी हेगडे यांनी महात्मा गांधींवर हल्लाबोल करत त्यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले स्वातंत्र्यासाठीचे आंदोलन हे ‘नाटक’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे समजत नाही की, लोक कसे अशा लोकांना भारताचे महात्मा म्हणतात, असेही त्यांनी म्हटले.
बेंगळुरु येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण स्वातंत्र्य लढा इंग्रजांच्या सहमतीने आणि मदतीने करण्यात आला आहे. या तथाकथित नेत्यांपैकी कोणत्याही नेत्याला पोलिसांनी एकदाही मारहाण केली नव्हती. त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा लढा हे एक मोठे नाटक होते.
या नेत्यांनी स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांच्या सहमतीने रंगमंचावर उतरवला होता. हा वास्तविक लढा नव्हता. तो मिलीभगत करत केलेला स्वातंत्र्य लढा होता. महात्मा गांधींचे उपोषण आणि सत्याग्रह हे एक नाटक होते, असा आरोप त्यांनी केला.