नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आता पुन्हा एकदा एकापाठोपाठ एक शहर लॉकडाऊन करण्यात येत आहे.मात्र अनलॉकनंतर कोरोना पुन्हा वाढतच चालाल आहे. त्यामुळे ठिकठिकाणी परत बंद तसंच बंदच्या हाका दिल्या गेल्या. तशी हाक उपराजधानी नागपुरात देखील परत द्यावी लागणार आहे. पण आताचा लॉकडाऊन हा गेल्या लॉकडाऊनच्या चुका न गिरवता कसा करायचा? याचा विचार सध्या पालकमंत्री डॉ. नितीन राऊत करत आहेत. त्यासाठी नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा एक आराखडा सर्व प्रशासकीय खात्यांकडून मागवला आहे.
पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असा आराखडा तयार करायला अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यानंतरच लॉकडाउनच निर्णय होईल असेही ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले. नागपुरात तीन हजारच्या वर कोरोना रुग्ण झाले आहेत आणि 55 मृत्यू. त्यामुळे आधीचा कंन्ट्रोल आता सुटला असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचं आहे, असं राऊत यांना वाटतं. मात्र जोपर्यंत याधर्तीवर आराखडा बनत नाही तोपर्यंत लॉकडाऊन करण्यातही अर्थ नाही, असे ते मानतात. तसेच लॉकडाऊन करण्याआधी लोकांना तयारीसाठी 1 आठवडा देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
डॉ. राऊत यांनी व्हिजन असलेली मंडळी लॉकडाऊन करणाऱ्या प्रशासनाने विचारात घेतली तर जास्त चांगला प्रतिसाद मिळू शकेल हे नक्की. नागपूरच्या प्रशासनाने एकत्र बसून, ठरवून, आराखडा बनवावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत. पण शेवटी प्रश्न हा आहे कि नागपूरचे प्रशासन चांगले नक्की आहे, पण ते एकत्र बसू शकतील का?