नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम केला कमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/2020_7largeimg_737449985.jpg)
कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.मात्र आता विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे सर्वच शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. यामुळे दिवसाचे काही तास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, सिलॅबस पूर्ण करणे अशक्य बनले आहे. यामुळे सीबीएसईने अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय असून त्यांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमातील काही मुलभूत बाबी वगळता 30 टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मंत्री रमेश पोखरीयाल यांनी जाहीर केला आहे.यानंतर लगेचच सीबीएसईने अभ्याक्रम वगळल्याचे पत्रक ट्विट करून याचा माहिती दिली आहे.
कोरोना साथीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीएसईला परवानगी दिली आहे. न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने सीबीएसईला परीक्षा रद्द करण्यासाठी एक अधिसूचना जारी करण्यास परवानगी दिली.