देशात 54 हजार नव्या बाधितांची नोंद
आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या शेवटच्या 24 तासांच्या आकडेवारीनुसार, देशात 54 हजार 44 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर या काळात कोरोना विषाणूमुळे 717 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 76 लाख 51 हजार 107 झाली आहे. तसेच, देशात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 914 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांची संख्या आता भारतामध्ये सातत्याने कमी होत आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात आतापर्यंत 67 लाख 95 हजार 103 लोक कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात 61 हजार 775 रुग्णांना योग्य उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. देशात कोरोना 7 लाख 40 हजार 90 सक्रिय रुग्ण आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार 20 ऑक्टोबरपर्यंत देशात 9 कोटी 72 लाखहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन आठवडय़ांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या नवीन प्रकरणांची गती कमी होत आहे. देशात मृत्यूची संख्याही कमी होत आहे.