देशात गुंडाराज, बलात्काऱ्यांना फासावर लटकवा, इम्तियाज जलील यांची मागणी
औरंगाबाद | उत्तरप्रदेशातील हाथरस गावातील पीडितेला औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. औरंगाबाद चौकात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत कँडल पेटवून श्रद्धांजली दिली. यावेळी एमआयएम खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका केली.
“सुप्रीम कोर्ट, सीबीआय, लोकसभा आणि पार्लमेंटवर विश्वास आहे. परंतु याच संस्था धोका देत असतील तर काळजी करण्याची वेळ आली आहे. पीडितेच्या घरच्यांना भेटू नाही दिले म्हणजे हे गुंडाराज आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
“हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावले पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?”, असा सवालही यावेळी जलील यांनी उपस्थित केला.