breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

चीन व पाकिस्तानला धडकी भरवणारा काय आहे भारताचा BR प्लॅन? पहा सविस्तर…

मुंबई: गेल्या 5 महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. विशेषतः लडाखमध्ये चीननी घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतानी हाणून पाडल्यानंतर तर तो आणखी चवताळला आहे. तेंव्हापासून दोन्ही देशांच्या लष्कराचे उच्चस्तरीय अधिकारी चर्चा करत आहेत. अनेकदा या चर्चांच्या फेऱ्या झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघताना दिसत नाहीये.

पण एक गोष्ट लक्षात येईल की भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर चीननी परत घुसखोरी करण्याची हिम्मत केलेली नाही. ‘लडाखच्या भारत चीन सीमा रेषेवर (LAC) तणाव वाढवण्यामागे चीनचा मोठा कट असून त्यामुळे युद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण जर युद्ध झालंच तर त्याला जबाबदार चीनच असेल आणि त्याचे परिणामही चीनला भोगावे लागतील,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नुकताच चीनला इशारा दिला आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतही भारताच्या कोणत्या प्लॅनमुळे चीन आणि पाकिस्तान यांना का धडकी भरली आहे?

काय आहे आपल्या देशाचा BR प्लॅन?

चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध झालेलं तर लष्कर आणि वायुसेनाच महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे भारताने BR प्लॅन तयार केलेला आहे. B म्हणजे भीष्म रणगाडा आणि R म्हणजे राफेल फायटर जेट विमान. लडाखमध्ये 15 ते 17 हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने भीष्म रणगाडे तैनात केलेले आहेत. चीनच्या T-63 या T-99 रणगाड्यांपेक्षा भारताचे रणगाडे जबरदस्त शक्तिशाली असल्याचंही सैन्यानं सांगितलेलं आहे. त्यामुळे जर चीननी युद्ध केलं तर त्यांनाच जोरदार चपराक बसेल हे भारताच्या शस्रसिद्धतेमुळे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे या प्लॅनच्या R भागासाठी भारतीय वायुसेना राफेल फायटर जेट विमानांसह सज्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून त्यांचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारतानी राफेल आणल्यावरच त्यांच्या मनातील भीती व्यक्त केलेली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button