breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गुजरातमधील मासळी रेल्वेने पश्चिम बंगालला रवाना
गांधीनगर – पश्चिम रेल्वेने गुजरातमधील मासळी पश्चिम बंगालला पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली असून ओखा रेल्वेस्थानकातून ३ विशेष पार्सल बोगीतून आतापर्यंत ५७ हजार किलो मासळी पाठवली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने पश्चिम बंगालमध्ये मासळीला असलेली जास्त मागणी लक्षात घेऊन गुजरातमधील मच्छीच्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर राजकोट परिमंडळाने मासळीचे पार्सल पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राजकोट स्टेशनवर पोरबंदर-शालीमार ट्रेनला मच्छीच्या पार्सलची विशेष बोगी जोडण्यात आली. त्यातून ही मासळी पाठवण्यात आली. यातून रेल्वेला ४ लाख १६ हजारांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.