breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/images-6.jpeg)
शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून खरीप हंगामातील १४ पिकांसाठी नवे हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. या पिकांच्या हमीभावातील वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न ५० ते ८३ टक्क्यांनी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पीक कर्जाच्या व्याजावरील सवलतीचा लाभ आता ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर केली तर तीन टक्के व्याजसवलत दिली जाते. या सवलतीची कालमर्यादा १ मार्च होती. त्याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.