कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित करतांना 21 वं शतक भारताचं आहे असं म्हंटल आहे. या शतकात भारताला ते साधायचा एकच मार्ग आहे. स्वयंपूर्ण भारताचा. संकटातून संधी शोधायला हवी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून दिला. 21 वं शतक भारताचं आहे. कोरोनापूर्वीचं जग समजून घ्यायची संधी आपल्याला मिळाली आहे. 21 वं शतक भारताचं असेल हे आपलं स्वप्न नाही, तर जबाबदारी आहे. पण याचा मार्ग काय? जगातली आजची स्थिती आपल्याला शिकवते आहे, सांगते आहे एकच मार्ग – स्वयंपूर्ण भारत आणि – आत्मनिर्भर भारत आपल्याकडे शास्त्रांत सांगितलेला हा एकच रस्ता आहे असं मोदींनी म्हंटल आहे.
जगभात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात आतापर्यंत पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या एका विषाणूने जगातल्या कोट्यवधी लोकांचे जीव धोक्यात आहेत. सारं जग जीव वाचवायच्या लढाईत गुंतलं आहे. आपण कुणीच हे असं संकट यापूर्वी पाहिलेलं नाही. ऐकलेलंही नाही. मानवजातीसाठी हे सगळं अकल्पित आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. पण हरणं, थकणं, हार मानणं मानवाला मंजूर नाही.