Breaking-newsताज्या घडामोडी

केंद्रातील NDA सरकारही पाडता येऊ शकतं- अॅड. प्रकाश आंबेडकर

केंद्रात सत्तेत असलेले भाजप प्रणित एनडीए सरकार पाडता येऊ शकतं, असा विश्वास वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बिहार विधानसभा निवडणूक 2020,आम्ही देशाच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानतो. बिहार विधानसभा निवडणुकीत जर एनडीए सरकारचा (जदयु-भाजप) पराभव करता आला तर आम्ही असे मानतो की केंद्रातील विद्यमान सरकारही पाडता येऊ शकते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, देशाच्या भवितव्यासाठी बिहार विधानसभा निवडणूक 2020 किती महत्त्वाची आहे हे आम्ही चांगलेच जाणतो. त्यामुळेच आम्ही आघाडीचे राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आंबेडकर यांनी बिहारध्ये विद्यमान सरकारचा (एनडीए- जदयु- भाजप) पराभव झाला तर भविष्यातले राजकारण कोणत्या दिशेने जाऊ शकते याचे काही संकेतच अॅड. आंबेडकर यांनी दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बिहारमध्ये 2015 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. ही निवडणूक लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि नीतीश कुमार यांचा संयुक्त जनता दल या दोन पक्षांनी एकत्र लढवली. तर काँग्रेस आणि भाजप यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढवली. परिणामी जद आणि जदयु या दोन पक्षांना जनाधार मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button