ऑटो रिक्षा, टॅक्सी वाहनांना 17 मे पर्यंत प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध: डॉ. स्टिव्हन अल्वारिस
कोल्हापूर ।महाईन्यूज । प्रतिनिधी
ऑटो रिक्षा, सहा आसनी रिक्षा तसेच टॅक्सी यांना 17 मे पर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांनी दि. 3/5/2020 च्या आदेशातील मुद्दा अ (5) प्रमाणे ऑटो रिक्षा/सहा आसनी रिक्षा, सर्व प्रकारच्या टॅक्सी सेवा यांना बंदी आदेशाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक प्रतिबंधित असेल असे आदेशीत केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लॉक डाऊन कालावधीत 17 मे पर्यंत ऑटो रिक्षा, सहा आसनी रिक्षा, टॅक्सी संवर्गातील वाहनांना वैद्यकीय किंवा इतर विशेष सवलत दिलेली नसेल तर प्रवासी वाहतूक करता येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या वाहनांना विशेष सूट दिलेली असेल अशा चारचाकी वाहनातून चालक व जास्तीत- जास्त दोन सहप्रवासी यांचीच वाहतूक करता येईल. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.