आज राज्यात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ, ४ हजार ८००च्या आसपास रुग्ण वाढले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Coronam-7-2.jpg)
मुंबई | महाराष्ट्राचा २५ जून रोजी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या कोरोना रिपोर्टनुसार आज राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या समोर आली आहे. आज राज्यात ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण चिंतेचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. राज्यातील एकूण अॅक्टीव रुग्णांची संख्या ६३,३४२ झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज ३६६१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ % एवढे झाले आहे. आज राज्यात ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८,४८,०२६ नमुन्यांपैकी १,४७,७४१ ( १७.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५६,४२८ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.