breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अरुणाचलमधून बेपत्ता झालेल्या ५ तरुणांना चीन भारताच्या ताब्यात देणार: रिजिजू

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता झालेल्या ५ जणांना शनिवारी भारताच्या ताब्यात देणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पाच जण बेपत्ता झाले होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सेनेला अरुणाचल प्रदेशातील ५ युवकांना सोपवणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे पाचजण १२ सप्टेंबर २०२० ला नियोजित ठिकाणी केव्हाही दाखल होऊ शकतात, असे रिजिजू यांनी ट्विटमध्ये माहिती देताना सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button