breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यात खरच मास्कसक्ती लागू झाली का? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले उत्तर

मुंबई : राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. अशात सर्वच निर्बंध हटवले असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण या सगळ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यामुळे खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी कुठलीही बंदी नसली तरीही नागरिकांनी आपली काळजी घेत मास्कचा वापर करावा असे आवाहन राजेश टोपे यांनी दिले आहे. रेल्वे, बस, सिनेमागृहांमध्ये मास्क घालणं अनिवार्य असून ट्रेन आणि शाळांमध्येही मास्कचा वापर करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आरोग्य मंत्र्यांकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button