१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस घेता येणार
नवी दिल्ली – देशात आतापर्यंत कोविड योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणारे रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. मात्र आता यात बदल करण्यात आले असून १ एप्रिलपासून देशभरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केली आहे. त्यानुसार ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल.
वाचा :-नवनीत राणा अरविंद सावंतांविरुद्ध गुन्हा दाखल करणार
भारताकडे मुबलक प्रमाणात लसी आहेत, अशी माहिती केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. याशिवाय दोन्ही लस सुरक्षित असल्याचेही जावडेकर म्हणाले आहेत. त्यामुळे मान्यता मिळालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करून लस घ्यावी, असे आवाहनही केंद्र सरकारतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, भारतात आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.