breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला; संजय राऊतांची खोचक टीका

नवी दिल्ली –  महाराष्ट्रात सध्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांना बदल्यांच्या रॅकेट संदर्भात एक अहवाल सादर केला.

वाचा :-कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्राकडून नवी नियमावली, ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अहवालाची खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीला येताना गृह सचिवांकडे बॉम्ब घेऊन आले होते. पण तो लवंगी फटाका असून त्याला वातही नसल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आल्याचं कळलं, ते बरोबर कोणतातरी कागद घेऊन आल्याचंही ऐकायला मिळालं. पण त्या तथाकथित अहवालामध्ये काडीचाही दम नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्याबरोबरच तो अहवाल जाहीर करा, ते वाचल्यानंतर कळेल की सरकारला अडचणीत आणेल असं त्यामध्ये काहीही नाही.

गृहमंत्री अनिल देशमुख हेच राज्याचे गृहमंत्री राहतील असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. सरकारमध्ये काही ठिकाणी भोकं पडली असून माहिती देणारे अधिकारी कोण आहेत याचा शोध घ्यावा लागेल असं सांगून मुख्यमंत्री योग्य वेळी बाहेर आल्यानंतर तोफगोळे आणि बॉम्ब घेऊन फिरणाऱ्यांमध्ये काहीच दम नव्हता हे स्पष्ट होईल आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर बोलण्याची काहीच गरज नाही तसेच त्यात बोलण्यासारखं काही नाही असंही संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button