ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अभिषेक बच्चन याने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना दिले उत्तर

तिच्या सौंदर्यासाठी सर्वाधिक ओळखली जाते, ऐश्वर्याच्या काही दमदार चित्रपटांची उदाहरणं दिली.

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने केवळ तिच्या सौंदर्यानेच नाही तर दमदार अभिनयकौशल्यानेही असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी 1994 मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. करिअरमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारूनही ऐश्वर्याला अनेकदा ठराविक टीकांचा सामना करावा लागला. तरी ऐश्वर्याने या टीकेवर नेहमीच प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मात्र तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन याने पत्नीला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं होतं. ऐश्वर्याला प्लास्टिक म्हणणाऱ्यांना त्याने सडेतोड उत्तर दिलं होतं.

तुम्ही खरंच पाहिलंत तर आणि आता मी एक पती म्हणून बोलत नाहीये तर एक सहकलाकार आणि एक अभिनेता म्हणून बोलतोय. तिने तिच्या करिअरमध्ये बऱ्याच धाडसी भूमिका साकारल्या आहेत. ती तिच्या सौंदर्यासाठी सर्वाधिक ओळखली जाते, मग त्याला साजेशाच भूमिका ती साकारू शकली असती. तरीही तिने आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत, असं अभिषेक मुलाखतीत म्हणाला होता. यावेळी त्याने ऐश्वर्याच्या अशा काही भूमिकांची उदाहरणंही दिली. त्यात त्याने दिग्दर्शक जग मुंध्रा यांच्या ‘प्रोवोक्ड’, रितूपर्णो घोषण यांच्या ‘चोखर बाली’ आणि ‘रेनकोट’, मणि रत्नम यांच्या ‘गुरू’ या चित्रपटांचा उल्लेख केला. ऐश्वर्याबद्दल बोलताना तिच्या प्रतिभेचंही कौतुक करा, असं अभिषेक म्हणाला होता.

ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. 2009 मध्ये तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्याही जोरदार चर्चा आहेत. 17 वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र या चर्चांवर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात जेव्हा दोघं वेगवेगळे आले, तेव्हा घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. या लग्नात अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत आला होता, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघीच नंतर आल्या होत्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button