breaking-newsमनोरंजन

‘प्रियांकाला बॉलिवूडमध्ये कामच करायचं नसेल…’

प्रियांका चोप्रा आणि सलमानमध्ये सुरू असलेलं ‘शीतयुद्ध’ आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. ऐनवेळी ‘भारत’ चित्रपटाला नकार दिल्यामुळे सलमाननं सर्वांसमोर प्रियांकाच्या अव्यवहारिक वागण्यावर पुन्हा एकदा आपली नापसंती दर्शवली आहे. ‘भारत’मध्ये भूमिका मिळावी म्हणून प्रियांकानं माझ्या बहिणीला हजारवेळा तरी फोन केले असतील. इतकंच नाही तर अली अब्बास जफारकडेही तिनं काम मिळवण्यासाठी विनंती केली होती. मात्र हॉलिवूडमध्ये काम मिळताच तिनं चित्रपटाला सोडचिठ्ठी दिली.

प्रियांकाला कदाचित माझ्यासोबत काम करायचं नसेल किंवा तिला फक्त आणि फक्त हॉलिवूडमध्येच काम करायचं असेल अशी खोचक प्रतिक्रिया सलमाननं दिली आहे. ‘भारत’मध्ये काम मिळावं यासाठी तिनं अर्पिता खानला वारंवार फोन केले. मात्र ऐनवेळी साखरपुडा आणि लग्नाचं कारण सांगून तिनं चित्रपटाला नकार दिला. साखरपुडा आणि लग्न करण्यासाठी तिला चित्रिकरणातून खास वेळ देण्याचीही माझी तयारी होती. मार्ग निघालाच असता पण तिची तयारी नव्हती असं म्हणत सलमाननं पुन्हा एकदा आपला राग व्यक्त आहे.

प्रियांकानं ऐनवेळी चित्रपटातून काढता पाय घेतल्यानं आता त्याजागी कतरिना प्रमुख भूमिका साकारत आहे. प्रियांकानं यासाठी सलमानची माफीही मागितली आहे, मात्र सलमान काही केल्या प्रियांकाला या चुकीसाठी माफ करायला तयार नाही असंच दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button