breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

धक्कादायक खुलासा! सुशांतच्या कुटुंबीयांना आधीपासून होती त्याच्या नैराश्याबाबत माहिती

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांत 2013 पासून मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्या नैराश्याबाबत सुशांतच्या कुटुंबीयांना देखील माहित होते. मुंबई पोलिसांना सुशांतच्या कुटुंबीयानी ही माहिती दिलेली होती. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. सुशांतची मोठी बहीण मितू सिंह यांचे असे म्हणणे आहे की, ‘ सुशांतने सर्वप्रथम आपल्या संपूर्ण कुटूंबाला ऑक्टोबर 2019 मध्ये त्याला नैराश्य असल्याचे वाटत असल्याचे सांगितले आहे.

त्यावेळी नीतू आणि प्रियांका मुंबईकडे विमानाने रवाना झालेल्या होत्या. त्या काही काळ सुशांतबरोबर राहत होत्या. 2019 मध्ये त्याला नैराश्यात असल्याचे जाणवू लागल्यामुळे त्याने डॉ. के चावला यांच्याकडून औषध घ्यायला सुरुवात केलेली होती.’ मुंबई पोलिसांसमोर सुशांतच्या बहिणींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याची एक कॉपी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील देण्यात आलेली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबातून असे स्पष्ट होते आहे की, 2013 पासून सुशांतच्या कुटुंबीयांना त्यांच्या मानसिक आजाराबाबत माहित होते.

मितू सिंह यांच्या स्टेटमेंटनुसार लॉकडाउन दरम्यान तो घरी होता. यावेळी तो व्यायाम आणि पुस्तके वाचत असे. 08 जून रोजी सुशांतने त्याची बहिण मितूला भेटण्यास बोलावले होते. संध्याकाळी मितूने विचारले त्याची चौकशी केलेली असता त्याने ठीक वाटत नसल्याचे सांगितले, तसंच लॉकडाऊनमध्ये तो कुठेही जाऊ शकला नव्हता. त्यावेळी मितू सुशांतबरोबरच राहिली होती, त्यांनी त्याचे दक्षिण भारतात जाण्याच्या प्लॅनबाबत देखील चर्चाा केली होती. मितू त्याच्या आवडीचे पदार्थ वस्तू बनवत असे. मात्र 12 जून रोजी मितू तिच्या गोरेगाव येथील घरी परतली कारण तिची मुलगी घरी एकटीच होती. तिने त्यानंतर सुशांतला निरोप पाठवला पण त्याने काहीच उत्तर दिलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button