TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातील गडचिरोलीत चकमक, ३८ लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार

गडचिरोलीः

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक (एसपी) नीलोत्पल यांनी सांगितले की, माओवाद्यांचे पेरिमिली आणि अहेरी दलमचे सदस्य माने राजाराम आणि पेरिमिली सशस्त्र चौकी दरम्यानच्या जंगलात तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सांगितले की, या माहितीवर कारवाई करत पोलिसांच्या C-60 दलाच्या दोन तुकड्या जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आल्या होत्या. चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांवर सुमारे 38 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

मारल्या गेलेल्या माओवाद्यांची ओळख पटली आहे
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला, ज्यावर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘चकमक झाल्यानंतर घटनास्थळावरून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यासोबतच शस्त्रे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासानुसार, मृतांपैकी एकाची ओळख पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी, तर अन्य दोघांची ओळख पेरिमिली दलमचा वासू आणि अहेरी दलमचा श्रीकांत अशी झाली आहे. नीलोत्पल म्हणाले की, मडावी हा या वर्षी ९ मार्च रोजी विद्यार्थी साईनाथ नरोटे यांच्या हत्येचा मुख्य आरोपी होता. ते म्हणाले की, परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button