#CoronaVirus: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या तीनशेवर
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत एकूण ३८ नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३०७ झाली आहे आणि एकूण १० जणांचा मृत्यू ओढवला आहे.
मंगळवारी सायंकाळी १० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कामथे ग्रामीण रूग्णालयातील ४ रूग्ण आहेत, तर दापोली आणि संगमेश्वर रूग्णालयात प्रत्येकी २ आणि रत्नागिरी व राजापूरच्या रूग्णालयात प्रत्येकी १ रुग्ण आहेत.
यापूर्वी सोमवारी रात्री उशीरा १० करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ९ जण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. तर ३० मेला मृत झालेल्या एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे करोनाबधितांची एकूण संख्या ३०७ झाली आहे. याचबरोबर आतापर्यंत जिल्ह्यातील ११६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ४२ रुग्णांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. त्यापैकी सकाळच्या सत्रात १८, तर रात्री उशिरा १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्वजण मुंबईहून जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोनागरस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात १ लाख ८ हजार ७८७ चाकरमानी दाखल झाले आहेत.