breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सर्वसामान्यांना सोसावा लागणार वीज दर वाढीचा भार
मुंबई : वीज बिलात सरासरी ७.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरु होत असून 1 एप्रिल पासूनच हे नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत.
हेही वाचा – मुंबई विमानतळावर ११ कोटींचं कोकेन तर साडेसहा कोटींचं सोनं जप्त
महावितरणने ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे. आजपासून वीजबिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना 1 एप्रिलपासून वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.