राज्यात पुढील ३-४ दिवसांत पावसाची शक्यता, कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट
पुणे : राज्यात पुढील ३-४ दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे.
मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील फक्त जळगाव जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्हा वगळता इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हेही वाचा – हार्दिक पंड्याची घरवापसी! मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला १५ कोटी देणार?
3-4 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट द्यI pic.twitter.com/bU6xhTrGu3
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 24, 2023
कोकणातही २५ नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट असणार आहे.