काश्मीर आणि सीएएमुळे भारताची डेमोक्रेसी इंडेक्समध्ये 10 अंकाची घसरण
नवी दिल्ली | भारताची डेमोक्रेसी इडेंक्समध्ये 10 अंकानी घसरण होऊन 51 व्या पोझिशनवर आला आहे. 2019 मध्ये भारताचा डेमोक्रेसी स्कोर 6.9 होता, जो मागील 13 वर्षातील सर्वात कमी आहे. द इकोनॉमिस्टने मंगळवारी 165 देशांची डेमोक्रेसी लिस्ट जारी केली. या रिपोर्टनुसार, काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे आणि नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यामुळे भारताच्या डेमोक्रेसी स्कोरमध्ये घट झाली आहे.
या सर्व मुद्द्यांना पाहता 2019 मध्ये भारतात खूप उलथा-पालथ झाली. सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राजकीय मतभेद निर्मा झाले. सीएएला सर्व देशात भेदभाव असलेल्या कायद्याप्रमाणे पाहण्यात आले. या सर्वांचा परिणाम 2019 मध्ये भारतातील सामाजिक स्वातंत्र्यता आणि त्याच्या लोकशाहीवर पडला.
द इकोनॉमिस्टने 2006 मध्ये डेमोक्रेसी इंडेक्स जारी करने सुरू केले होते. तेव्हापासून आतापर्यंत 13 वर्षातील भारताचा हा सर्वात कमी डेमोक्रेसी स्कोर आहे. 2014 मध्ये हा स्कोर सर्वात जास्त 7.92 होता. डेमोक्रेसी इंडेक्स निवडणूक प्रक्रिया आणि अनेकतेची स्थिती, सरकारची कार्यप्रणाली, राजकीय भागीदारी, राजकीय संस्कृती आणि सामाजिक स्वातंत्र्यासारख्या 5 मुद्द्यांवर जारी केली जाते.