संपूर्ण देशभर लस देण्यासंदर्भात कधीही सांगितले नाहीः आरोग्य सचिव
![Corona Update Govt has not speak about the entire vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-vaccination.jpg)
मुंबईः सरकारने कधीही संपूर्ण देशभर लस पुरविण्याचे सांगितले नाही, असे आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेले आहे. जगभर कोरोना लस शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सर्वसामान्यांना ही लस मिळणार का? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
Vaccination would depend on the efficacy of the vaccine & our purpose is to break the chain of #COVID19 transmission. If we're able to vaccinate critical mass of people & break virus transmission, then we may not have to vaccinate the entire population: ICMR DG Dr Balram Bhargava https://t.co/JF2vzdG7ml pic.twitter.com/OJk5QMuDFE
— ANI (@ANI) December 1, 2020
आरोग्य विभागाच्या सचिवांचे हे विधान चिंताजनकच आहे. लसीकरण हे त्या लसीच्या परिणामकारकतेवर अवलंबून असतं. तसेच आमचा प्रयत्न हा कोरोना संक्रमण साखळी तोडण्याचा आहे. जर आपण अत्यंत गंभीररीत्या संक्रमीत जनसमुदायाला लस दिली तर ही साखळी तोडू शकू. आणि त्यामुळे आपल्याला संपूर्ण देशभर लसीकरण करण्याची गरजच भासणार नाही, असे आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भारगव यांनी सांगितले.