breaking-newsराष्ट्रिय
संधिसाधू युतीमुळे जम्मू-काश्मीर पेटले – राहुल गांधी
नवी दिल्ली – भाजप आणि पीडीपीच्या संधिसाधू युतीमुळे जम्मू-काश्मीर पेटले. त्या राज्यात निष्पाप नागरिक आणि शूर जवान मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडले. अकार्यक्षमता, द्वेषाला नेहमीच अपयशाला सामोरे जावे लागते, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील राजकीय घडामोडींबाबत दिली.
कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीए सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात घेतलेली कठोर मेहनत वाया गेली. राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी नुकसान कायम राहील, असे ट्विट त्यांनी केले. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी लवकरात लवकर विधानसभा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. तूर्त त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याला अनुकूलता दर्शवली आहे.