breaking-newsराष्ट्रिय
वाहनचोरीच्या संशयातून जमावाने केली मारहाण, एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/crime-13.jpg)
देशात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे सत्र सुरुच आहे. मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात वाहन चोरीच्या संशयातून जमावाने तीन जणांना मारहाण केली. यातील दोन जण पळून गेले. मात्र, एक जण जमावाच्या तावडीत सापडला आणि जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील थोरोजॅम अवांग लेकाई येथे वाहन चोरीच्या संशयातून जमावाने तिघांना पकडले. यातील दोन जण पळून गेले. तर फारुख खान हा जमावाच्या तावडीत सापडला. जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. पाचही आरोपींवर हत्या व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.