वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल यांचा ‘राफेल’ प्रकरणी मोठा खुलासा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/air-chief-marshal.jpg)
नवी दिल्ली – भारतभर सध्या दोनच मुद्दे सध्या चर्चेत आहेत त्यातील एक म्हणजे ‘इंधन दरवाढ’ आणि दुसरे म्हणजे ‘राफेल विमाने खरेदी व्यवहार’ प्रकरण. यातील राफेल प्रकारंजास्त चवीने चोईघळले जात आहेत. कारण यावर सर्व पक्षांना मोदी सरकारवर निशाणा साधनांची नाव संधी मिळाली आहे.. यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सर्वात पुढे आहेत. परंतु, या प्रकरणाने आज नवीन वळण घेतले आहे.
दिल्ली येथे आज बुधवारी प्रेस ब्रिफींगमध्ये भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल बीएस धनोवा यांना राफेल व्यवहार प्रकरणी प्रश्न विचारले असता काही माहिती दिली. ते म्हणाले, हा करार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला देम्यात येणार होता. परंतु त्यांनी मागील विमानांच्या दिलवारीमध्ये उशीर केला होता. सुखोई-३०च्या डिलिव्हरीमध्ये तीन वर्षे उशीर, जगूआरच्या वेळी देखील सहा वर्षे उशीर, एलसीएसाठी पाच वर्षे उशीर त्याचबरोबर मिराज 2000 अपग्रेड मध्ये देखील दोन वर्षे उशीर केला होता.
विमानाची संख्या १२६ वरून ३६ करण्यात आली याची आपणाला माहिती दिली गेली होती का? या बाबत एअर चीफ मार्शल बीएस धनोवा म्हणाले की, उचित वेळी भारतीय वायुसेनेचा विचार घेतला गेला होता. त्यावर आम्ही त्यांना काही पर्याय सुचवले. त्यातील कोणाची निवड करायची हे सरकारचे काम आहे. ते म्हणायला येथे दसॉल्ट कंपनीला ऑफसेट भागीदार निवडायचा होता येथे सरकार, भारतीय वायुसेना यांची कोणतीच भूमिका नाही.