breaking-newsराष्ट्रिय

राजस्थानातील मंदिरे ७ सप्टेंबरपासून सुरू

जयपूर – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योगधंदे आणि इतर व्यवहार आता पुन्हा सुरू होत असून राजस्थान सरकारने येत्या ७ सप्टेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करणे मात्र सरकारने भाविकांसाठी बंधनकारक केले आहे.

राज्यातील मंदिरे ७ सप्टेंबरपासून सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क घालणे बंधनकारक आहे. याशिवाय त्यांनी सामाजिक अंतराचा नियम पाळला पाहिजे. मंदिरांमध्ये सॅनिटायझरचाही वापर केला पाहिजे, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. केंद्र सरकारने ८ जून रोजी देशातील प्रार्थनास्थळे खुली करण्यास परवानगी दिली होती. परंतु राजस्थानमधील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावेळी येथील मंदिरे खुली केली नव्हती

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button