breaking-newsराष्ट्रिय

मृतदेह मोजण्याचे काम शूरवीरांचे नाही तर गिधाडांचे : राजनाथ सिंहांचा काँग्रेसवर वार

हरिद्वार : भाजपचे जेष्ठनेते तथा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उत्तराखंड येथील हरिद्वार येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना पाकिस्तानातील बालाकोट हवाई हल्ल्यामध्ये मारलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी जाहीर करावी अशी मागणी करणाऱ्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर चांगलाच निशाणा साधला. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “काँग्रेसचे नेते बालाकोट हवाई हल्ल्यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असा प्रश्न विचारत आहेत मात्र मला सांगा शूरवीर कधी मृतदेह मोजत बसतात का? मृतदेह मोजण्याचे काम शूरवीरांचे नसून ते गिधाडांचे आहे.”

दरम्यान, भारतातील पुलवामा येथे पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला चढवला होता. या दहशतवादी कारवाईला प्रतिउत्तर देताना भारतातर्फे पाकिस्तानातील बालाकोट येथील जैशच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर हल्ला चढविण्यात आला होता. मात्र भारताने बालाकोट येथे केलेल्या दहशतवादी कारवाईच्या यशाबाबत विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून या कारवाईमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी प्रसिद्ध करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

ANI

@ANI

Home Minister Rajnath Singh in Haridwar: Lekin ispe Congress ke logon ko apatti hai aur keh rahe hain ki bataiye kitne logon ko mara hai? Batao, bahadur kabhi lashen ginte hain? Lashen veer nahi ginte, lashen giddh (vultures) ginte hain.

ANI

@ANI

HM:1971 mein Smt Indira Gandhi ne Pak ko dhool chataya tha,us samay Atal Bihari Vajpayee ji ne sansad mein khade hokar, unki prashansa ki thi.Yadi Pak ko dhool chatane ke liye Indira ji ka jaikara ho sakta hai to Pak ko sabak sikhane ke liye Modi ji ka jaikara kyun nahi ho sakta?

View image on Twitter
152 people are talking about this
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button