भाजपा हे तर मुहम्मद तुघलकाचं अपत्य : ममता बॅनर्जी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/MAMTA.jpg)
भाजपा म्हणजे मुहम्मद तुघलकाचं अपत्य आहे अशी घणाघाती टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. भाजपा हा असा पक्ष आहे ज्यामध्ये महाभारतातले दुःशासन आहेत. आम्ही भाजपासारखे दुःशासनाची पार्टी नाही अशीही टीका ममता बॅनर्जी यांनी केली.”महाभारत हे एक महाकाव्य आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. या महाकाव्यात दुःशासन हा कौरवांमधला एक राजपुत्र आहे. त्याच्या नावाचा अर्थ होतो वाईट शासन. मोदी सरकार असंच आहे” अशीही टीका ममता बॅनर्जींनी केलेली आहे.
ममता बॅनर्जी यांनी एनपीआर, एनआरसी आणि सीएएवरही कठोर शब्दात टीका केली. या तिन्ही गोष्टी म्हणजे केंद्र सरकार करत असलेली काळी जादू आहे अशी टीका त्यांनी केली. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच CAA, NRC आणि NPR ला त्यांचा विरोध दर्शवला आहे. NRC मुळे पश्चिम बंगालमधल्या ३० लोकांचा आत्तापर्यंत जीव गेला आहे. तर आसाममध्ये १०० लोकांचा बळी गेला आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? असाही प्रश्नही ममता बॅनर्जींनी विचारलेला आहे.