breaking-newsराष्ट्रिय
नीरव मोदी, मेहुल चोक्सीच्या बचावासाठी सरकारने आधीच मार्ग काढलाय : मल्लिकार्जुन खर्गे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Mallikarjun_Kharge.jpg)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा एकदा पीएनबी घोटाळाप्रकरणावरुन मोदी सरकारला निशाणा करीत जोरदार हल्ला चढवला आहे. देशातील बँकांची करोडो रुपयांची कर्जे बुडवून फरार झालेल्यांना वाचवण्यासाठी सरकारने मार्ग काढल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
खर्गे म्हणाले, सरकारने पहिल्यापासूनच नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या लोकांच्या बचावासाठी मार्ग शोधून ठेवला आहे. जर सरकारकडे एक वर्षांपूर्वीपासूनच या घोटाळ्याची माहिती होती तर त्यांनी कोणत्याही एजन्सीला चौकशीसाठी पाठवले नाही. उलट त्यांना पळून जाण्यास प्रोत्साहनच दिले. सरकार आणि मोदींच्या आशिर्वादाने त्यांनी बँकांकडून पैसा घेतला आणि पळून गेले.